आश्विन पौर्णिमा म्हणजे बौद्धांसाठी एक उत्सवच
आश्विन पौर्णिमा म्हणजे बौद्धांसाठी एक उत्सवच. भगवान बुद्धाने या दिवशी वर्षावास समारोपीय कार्यक्रम दिवस म्हणून बुद्धकालीन युगात या पौर्णिमेच्या दिवशी भगवान बुद्ध,भिक्खू तथा उपासक-उपासीका धर्माचे (धम्माचे) उपदेश देण्याच्या कार्यासाठी म्हणून प्रारंभाचा दिवस. आषाढ पौर्णिमेपासून ते आश्विन पौर्णिमेपर्यंत वर्षावासाचे कार्यक्रम असायचे. या तिन्ही पौर्णिमेच्या दरम्यान पावसाळ्याचे दिवस असतात. भिक्खू व भिक्खूणींना धर्माच्या (धम्माच्या) कार्यासाठी गावोगावी, खेळोपाळी, शहरात व पाळे इतरत्र ठिकाणी जाण्यास सक्त मनाई असते. वर्षावासाच्या काळात पावसाळ्यातील तीन पौर्णिमा अर्थात आश्विन पौर्णिमेपर्यंत आवतनित बौद्धविहार व्यथित करावयाचे असते. या काळात भिक्खू विनयात कमीपणा आला असेल त्यांना श्रेष्ट भिक्खूद्वारा भगवान बुद्धाचे मार्गदर्शन या काळात नऊ पौर्णिमाचे भ्रमण केलेले भिक्खू आपले अनुभव भगवान बुद्धापूढे मांडत असत. सम्यक तथागत बुद्ध त्यांना प्रश्न विचारत. त्यांच्यातील कमीपणा भरून काढत. या तीन पौर्णिमेच्या काळात फक्त एकदाच रात्रीला जेवण असायचे. ज्या ठिकाणी भिक्खू आणि भिक्खूनी यांचा संघ एकत्रित असे. त्या ठिकाणी ख...