पोस्ट नः 4 बुध्द आणि त्यांचा धम्म प्रथम खंड भाग पहिला
11) दुसरया दिवशी सकाळी महामायेने आपले स्वप्न शुध्दोदनास सांगितले .स्वप्नाचा अर्थबोध न झाल्यामुळे शुध्दोदनाने स्वप्नविद्येत पारगंत असलेल्या आठ ब्राम्हणाला बोलावून घेतले
12) त्यांची नावे राम, धन , लख्खन , मन्ती, यण्ण, सुयाम, भोग, व सुदत्त अशी होती .शुध्दोदनाने त्यांच्या स्वागताची यथायोग्य तयारी केली .
13) त्यांने सेवकांकडुन जमिनीवर फुलांचे सडे घालुन त्या ब्राम्हणासाठी उच्चासने मांडली .
14) त्याने त्या ब्राह्यणांची पाञे सोन्याचांदीचे भरुन घृतमधुयुक्त व साखरमिश्रीत दुध भाताचे सुग्रास भोजन देऊन त्यांस संतुष्ट केले .याशिवाय त्यांना नवी वस्ञे , गायी इत्यांदीचे दान दिले .
15) ब्राम्हण संतुष्ट झाल्यावर शुध्दोदनाने महामायेला पडलेले स्वप्न त्यांना सांगितले आणि तो म्हणाला " या स्वप्नाचा अर्थ मला सांगा"
16) राजा चिंता करु नकोस ब्राम्हण म्हणाले. तुला एक असा पुञ होईल की जर तो संसारात राहिला तर तो सार्वभौम सम्राट होईल पण संसारत्याग करुन जर तो संन्याशी झाला तर विश्वातील अंधःकार नाहीसा करणारा भगवान बुध्द होईल.
17) पाञातील तेलाप्रमाणे महामायेने बोधिसत्वाला आपल्या गर्भात धारण केले . तिचा प्रसुतीकाळ जवळ येऊ लागताच प्रसुतीसाठी आपल्या माहेरी जाण्याची तिने इच्छा व्यक्त केली . आपल्या पतीला ती म्हणाली " माझ्या पित्याच्या देवदहनगरीला मी जाऊ इच्छीते ".
18) तुझ्या इच्छेप्रमाणे होईल राजाने उत्तर दिले सोन्याच्या पालखीत बसवून शुध्दोदनाने मोठ्या लवाजम्यासहीत तिला तिच्या पित्याच्या घरी पाठविले .
19) देवदहला जात असताना मार्गात फुलांनी बहरलेल्या तसेच पुष्पविरहित अशा वृक्षाच्या आल्हादायक गर्द वनराईतुन महामायेला जावे लागणार होते .तेच लुंबिनी वन होय
20) लुंबिनी वनातुन पालखी नेली जात असताना ते वन स्वर्गीय अशा चिञातला वनाप्रमाणे किंवा एखाद्या महाप्रतापी राजाच्या स्वागतासाठी सुशोभित केलेल्या मंडपासारखे भासत होते.
क्रमशः वाचा
बुध्द आणि त्यांचा धम्म
प्रत्येक रविवारी सकाळी बुध्द विहारात गेलेच पाहिजे....
विश्वरत्न
डाँ बाबासाहेब आंबेडकर
Comments
Post a Comment